Monday 22 April 2013

व्यवस्थेची अवस्था आणि अस्वस्थता

                          घडतात …काही घटना घडतात …तश्या  त्या नवीन नसतात ….पण दरवेळी क्रूरतेची वाढत जाणारी पातळी माणूस  म्हणून हादरवून टाकणाऱ्या गोष्टी … अस्वस्थ होतो …  स्वतः जवळून हे पाहताना जाणवतं …किती बदलत चालल्या आहेत गोष्टी… कुठे चाललोय …हे थांबणार आहे का? कोण थांबवणार?  का कुणाला काहीच वाटत नाही … चिडतो _पेटून उठतो … मागच्या वेळी असेच चिडलेलो, काही   झालं  नव्हतं त्यावेळी …हे माहित असून…. मनं आहे ना …ते काही विचार करत नाही … मेंदू म्हणतो । शांत राहून विचार कर … व्यवस्था जर अशी आहे … तर गोष्टी अशाचं घडणारं … पण मनं मानत  नाही …त्याच्या समोर  दुट्टपी - स्वार्थी  लोकांचा नंगा नाच असतो… चिमुरडीला चिरडू  देणारा हा कुठला समाज? ज्या व्यवस्थेत निष्पाप छोट्यांना पण   हवे तसं जगून देत नाही … ती  काय व्यवस्था? नाही …  शांत नाही व्हायचं…गप्प नाही बसायचं … बोलायचं … लिहायचं  …टीकेचं  आसूड  उठले पाहिजे … 
                              व्यवस्था कशी असली पाहिजे- काय आहे …सगळे जण  घराच्या चार सुरक्षित भिंतीत बसून सल्ले देतात…  काय  व्हायला पाहिजे - पण  काय झालं …ह्यात  फरक आहे …. ह्या सर्वात एकाचा बळी  गेला …. आणि कुणाला काही वाटतं नाही …सगळे  ढिम्म  आहेत?    कुणाच्या वासना कधीही जाग्या झाल्या …जेव्हा  हवे तेव्हा काहीही करून मिळाल पाहिजे … अगदी हिसकावून ही …. झाली त्याची  भूक शांत झाली …तिल मारून …। सभ्य समाजाचा थोतरित  मारत त्याने भूक भागवली … प्राणी कसा सावज टिपतो …त्याने  मिळेल त्या संधीत फायदा उठवत …  नाती-संस्कृती-माणुसकी  सगळ्याचा एका फटक्यात खून केला …आणि  सगळे  सांगणार व्यवस्था काय करणार याला?  सुन्न करणार आहे हे … माणूस इतका निब्बर झालाय ? परत कसा ठेवायचा विश्वास? कुणावर ठेवायचा विश्वास?
                               राग शांत होईना …व्यक्त झाले…तर समाजातील संस्कृती रक्षक आले लगेच -आपला झेंडा  उंच मिरवत …. चूक तुमची …मर्यादेत  राहा …हद्दित राहा …. टाळी  एका हाताने वाजत नाही ! वाटल थोबाड फोडावी या दांभिक लोकांची!  तुमच्या  चुकांची किंमत दुसर्याने चुकवावी ? वर्तन कुणाचं चुकलं? कोणत्या संस्कृतीने माणसाला  हिंस्त्र श्वापद सारखं वागायला शिकवला?
                       या वेळी परत  लोक  खरंच उतरले रस्त्यावर … मनातून थोड हायस वाटलं …. आहे … आहे माणुसकी … Hopes सोडायला नको…  तिच्या नावावर आक्रोश वाढत गेला…आणि काही काळानंतर  ते ही  नाटकच  वाटू  लागलं !  तिच्या  नावावर  काही जण  स्वतःला चमकवून  घेऊ  लागले !  Dictonary मधून मोठे मोठे शब्द झाडत काहींनी अश्रू  ढाळले -काहींनी खेद व्यक्त केला …मेणबत्त्या लावायला विसरले  नाही…  जवाबदार नागरिक म्हणून कर्तव्याची इतिपुर्तीच होती ती !
                       हे इथच थांबल नाही … सत्ताधारी पक्षांच्या राज्यात काय झाल-विरोधकांच्या राज्यात पण पहा … आम्ही त्यांच्यापेक्षा बरे… असं  व्यवस्था चालवणार्यांनी   स्वतःलाच प्रशस्तिपत्रक दिलं …. त्यांचे समर्थक ही  ते पत्रक मिरवत आहेत …. व्वा …काय  कर्तृत्व !  ती  तडफडून मरते … जगण्याची इच्छा  असताना…हा सगळा समाज तिला मिळून मारतो ….  पण आम्ही उजळ माथ्याने फिरतोय !