Saturday 28 December 2013

राजकारण- आम आदमीच्या (समजुतीच्या) पलिकडेचं!!

            
                आम आदमीपक्षाविषयी लिहिलं तो एक राजकारणाचा Emotional भाग होता..आपल्या देशात मतदार असाचं विचारकरतात...जेव्हा सरकार विरोधात प्रचंड राग आणि चीड असते...आणि अशावेळी जर कोणी छोटीशी पण दाखवली..तर लोकं त्यांना मतदान करतात...पण राजकारणाचा एक Practical भाग आहे, ज्यानुसार राजकारण चालतं...

                    दिल्लीत निवडणुकाझाल्या..भाजपाला 31 (अकाली दल 1) , आपला 28, कॉग्रेसला 8, अपक्ष 2 जागा मिळाल्या.

   #भाजपा

-भाजपाने दिल्लीत सत्तास्थापन केली नाही कारण त्यांच्याकडे बहुमत तर नव्हतं पण त्यांना राष्ट्रपती राजवटलागू होऊन, विधानसभा आणि लोकसभा पुन्हा व्हाव्यात असं वाटतं होतं
-कारण दिल्लीतविधानसभा निवडणुकीच्यावेळी लोकं म्हणतं होती..."विधानसभा के लिए अरविंद और लोकसभा के लिए मोदी!"
-कोणाला मानायचं नसलं तरी नरेंद्र मोदी हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे..जो तरूणाईला, मध्यमवर्गीयांना,कॉग्रेसविरोधात प्रचंड राग असलेल्या जनतेत आहे....जर दिल्लीत विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र झाल्या तर सगळ्यात जास्त फायदा भाजपाला होईल.
-त्याहून महत्त्वाचं म्हणजे आम आदमी पक्ष दिल्लीतचं अडकून पडेल...आम आदमी पक्षाकडे कार्यकर्ते नाहीआहेत..या पक्षाचा एकचं चेहरा आहे, अरविंद केजरीवाल...जर केजरीवाल हे दिल्लीतल्या दोन निवडणुकांमध्ये गुंतले तर आम आदमी पक्ष दिल्लीबाहेर जास्त ताकद लावू शकणार नाही, मर्यादा येतील त्यांच्यावर!

#आम आदमी पक्षाविषयी

-आम आदमी पक्षविरोधी पक्षात बसायला तयार होता..त्यांना आपल्याला सत्ता स्थापन करावी लागेलं असं वाटलचं नाही...पण कॉग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे त्यांची अडचण झाली.
-सत्ता स्थापन केलीनाही तर लोकंच दोष देणारं...संधी मिळून पण जबाबदारी टाळली...आणि कॉग्रेसचा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन केली तर दोष..म्हणून जनसभा करून त्यांनी हे दाखवलं दिल्लीची जनता सांगतेय म्हणून आम्ही सत्ता स्थापन करतोय.
-पण हे करताना आम आदमी पक्षाने हे स्पष्ट केलं की आम्ही कोणाचाही पाठिंबा घेतला नाही..तीन जानेवारीला विश्वासमत सिध्द करताना ज्यांना पाठिंबा द्यायचाय त्यांनी द्यावा..
-आम आदमी पक्ष तीनजानेवारी पर्यंत सात दिवस सरकार स्थापन करण्याच्या हिशोबानं आलयं...जर टिकलं तर त्यांना दोन महिने मिळतात.(फेब्रुवारी पर्यंत लोकसभा निवडणुक जाहीर होईल, Code of Conduct लागल्यावर कोणतेही निर्णय होत नाही)  या दरम्यानं लोकांसाठी काही  मोठे निर्णय घेऊन आपण करून दाखवलं हे सांगत  लोकसभा निवडणुकीला सामोरं जाता येईलं.

-जर तीन जानेवारीला सरकार पडलं तरी लोकांचा पुन्हा emotional पाठिंबा मिळेल, "अरे इन्होंने कोशिश तो की...दुसरीपार्टीयों ने सरकार चलने नहीं दी.." .त्यामुळे आपचं सरकार चालण ही आप पेक्षा दुसऱ्यापक्षांवर जबाबदारी जास्त आहे...कारण हे सरकार पाडल्याचं पातकं कुणालाही नकोय..
-आपने दिल्लीत सरकार स्थापन केल्यामुळे दिल्लीबाहेर हा पक्ष वाढायला, त्यांना मदत होतेय...राजकारणात असाही बदल घडू शकतो  दाखवल्यामुळे आपकडे अनेक तरूण, सुशिक्षित वळतं आहेत..आपची सध्या वेगवेगळ्या राज्यात कार्यकर्ता नोंदणी सुरू आहे..त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय..लोकसभा निवडणुकीसाठी  किमान आपकडे दिल्लीबाहेर कार्यकर्ते तरी वाढत आहेत ...जे आता कमी आहेत..


    #आता सगळ्यातमहत्त्वाचं म्हणजे कॉग्रेस

-कॉग्रेस हासत्ताधाऱ्यांचा पक्ष आहे...हे उगीचं कोणी म्हणतं नाही...कॉग्रेसला नुसत्या निवडणुकाचं जिंकता येत नाही...तर विरोधकांना सत्ता स्थापण्यापासून अडवता ही येतं..चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये सडकून मार खाल्यावर कॉग्रेसने किमान दिल्लीत भाजपाला सत्ता स्थापन करू दिली नाही.. म्हणून त्यांनी आपला पाठिंबा देत पुढे केलं..
-नितीन गडकरी काल जे म्हणाले त्यात तथ्य आहे...कॉग्रेसला या गोष्टीची पुरेपूरं कल्पना आहे की २०१४ च्यालोकसभा निवडणुकीत त्यांचं पानिपत होतं आहे....पण ही सत्ता काहीही झालं तरी नरेंद्र मोदींच्या हातात त्यांना जाऊ द्यायची नाही....त्यासाठी जे जमेल ते करायचंय!! ( नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये बारा वर्ष  जितका त्रास कॉग्रेसने दिलाय, त्याची परतफेड करण्याची एकही संधी कॉग्रेसला त्यांना द्यायची नाही! )
-कॉग्रेस वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना ताकद देतंय...जसं बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांना ते जवळ करणार आहेत..(लालू तुरूंगातून बाहेर येताचं नरेंद्रमोंदीच्या विरोधात बोलले)..उत्तर प्रदेशात मायावतींना ते जवळ करतील...ज्या ज्या राज्यांमध्ये जमेल तिथे ते मोदींच्या पायात पाय घालण्याचा प्रयत्न करतील....
-२००९ लोकसभाच्यावेळी मुंबईत लोकांनी Emotional  होऊन मनसेला भरभरून मत दिली...याचा फायदा झाला कॉग्रेसला...त्यांचे खासदार निवडून आले...असाच फायदा कॉग्रेसला आपचा शहरी भागात  करून घ्यायचा आहे.
- आपला दिल्लीत तरूणांनी, पहिल्यांदा मतदान करणारे, मध्यमवर्गीय, सुशिक्षित,सोशल नेटवर्किंगचा प्रभावअसलेल्या मतदारांनी मत दिली...ही नरेंद्र मोदींची VOTE BANK आहे...आप आता ज्या ज्याशहरांमध्ये-राज्यांमध्ये जाईल तिथं ते कॉग्रेस विरोधातील पण नरेंद्र मोंदींनाअपेक्षित असलेली मतं घेतील..आणि कॉग्रेसचा फायदा होईल, असं कॉग्रेसला वाटतय....त्यामुळे आप जितकी मजबूत तितका कॉग्रेसचा फायदा

           सध्या विविध राजकीयपक्षात, ज्येष्ठ पत्रकारांमध्ये ज्या चर्चा चालू आहेत, त्यातून आलेले मुद्दे आणि मला जे दिसतयं, कळतयं ते इथे मांडण्याचा प्रयत्न आहे..हे चित्र दुसर्यांच्या नजरेतून वेगळही असेल...पण राजकारण हा अतिशय Interesting Game आहे...मतदार हा Emotional असल्यामुळे  त्याला कोणीभाबडी आशा दाखवली की तो त्याला मत देतो...पण त्याला हे समजतं नाही की त्यानेज्याला मत दिलं त्याचा खरा फायदा होतोयं कुणाला...आणि राजकीय पक्ष अशीच रणनीतीआखतं असतात...

'आम आदमी' की खास सरकार!!

          
            दिल्लीत आल्यावर सगळ्यात मोठी story कोणती cover केली असेल तरी ती अण्णांच जनलोकपालचं आंदोलन...या आंदोलनाच्या वेळी पत्रकार परिषदेत साध्या वेशात एक माणूस होता..त्याविषयी जास्त माहिती नव्हती म्हणून बाईट घेण्याचा प्रश्न नव्हता..अण्णाच्या पत्रकार परिषदेत अण्णा, किरण बेदी, मग प्रशांत भूषण दिल्लीचे वकील,ओळखीचा चेहरा..पण हा एक माणूस होता,त्याच्याकडे आम्ही आंदोलन कसं असेल, काय करणार याची माहिती घ्यायचो...जंतर मंतर दररोज अण्णाचे वन टू वन शक्य नव्हते..त्या साधा माणसाला जाऊन सांगितल..दररोज सकाळी आणि संध्याकाळी एक वेळ ठरवा आणि प्रेस कॉन्फरन्स घ्या...त्याने चक्क ऐकलं...तो साधा माणूस अरविंद केजरीवाल...अरविंद केजरीवालांबरोबर पक्ष स्थापनेच्या दिवशी ते काही महिन्याआधी दिल्लीच्या रस्त्यावर बसून आंदोलन करताना बातम्या केल्या...पण तेव्हा जाणवलं नाही, ते पुढे जाऊन दिल्लीचे मुख्यमंत्री होतील...
                                                                                                                                                                              आज पुन्हा त्याचं रामलीला मैदानावर अरविंद केजरीवाल आणि त्यांची टीम होती आणि पुन्हा तेचं आम्ही...ते व्यासपीठावर आले तेव्हा एकचं विचार मनात आला...अरे हा तर आपल्यातला माणूस होता...आज हा मुख्यमंत्री झाला...जंतर मंतरवरून राजकारणात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला...आणि आज त्यांनी राजकारण बदलू शकतं, हे उदाहरणासह दाखवून दिलं.. आम आदमी पक्षाविषयी आताचं जास्त आस्था नाही वाटतं मला...कारण मनसे असेल, अण्णांच आंदोलन असेल...दर वेळी वाटायचं काही होईल,ही लोकं आपल्याला निराश करणार नाहीत...पण वेळेनुसार अंदाज चुकले,अनुभव वेगळे आले आहेत...त्यामुळे आता पटकन विश्वास ते ही राजकीय पक्षावर...जरा कठीण आहे. 

           पण असं असलं तरी अरविंद केजरीवालांना एका गोष्टीसाठी मी मानते...त्या माणसानं राजकारणात उतरायचं ठरवल...एका वर्षात दिल्लीत पक्ष छोट्यातल्या छोट्या माणसापर्यंत नेला...राजकारणात एखाद्याचं मूल्यांकन हे निवडणुकातील निकालांनुसार ठरतं...आणि राजकीय पक्ष जात,धर्म आणि काय काय बघून मतदारसंघात उमेदवार उभे करतात.. अरविंद केजरीवाल स्वत हरियाणाचे ..निवडणुक लढवायची, सत्ताधार्यांना आव्हानं द्यायचं तर त्यांनी शीला दिक्षीत यांच्या विरोधात निवडणुक लढवली...आणि पंधरा वर्षात जी भाजपा शीला दीक्षितांना हरवू शकली नाही...त्यांना अरविंद केजरीवाल यांनी आपल्या आयुष्यातील पहिल्या निवडणुकीत हरवून दाखवल...हिंमत्त म्हणतात ती ही...अरे एकदा भिडायचं ठरवलं ना तर सरळ भिडायचं...आज अनेक नेते आपला आपला सुरक्षित मतदारसंघ निवडतात...त्यात आव्हान काय? 

        महाराष्ट्रात असे कोणते विरोधी पक्षातले नेते तुम्हांला दिसतात जे अजित पवारांना आव्हान देऊ शकतात?? ( इथे मुख्यमंत्री म्हणतं नाही कारण ते स्वत विधान परिषदेवर निवडून आले आहेत..) शिवसेना आणि मनसे अध्यक्ष अजित पवारांचं आव्हानं स्वीकारतील?...समोरासमोर निवडणुक लढवतील...?? अरविंद केजरीवाल झोपडपट्टीत गेले,छोट्यातल्या छोट्या माणसाशी बोलले...रस्तावर बसून आंदोलन केली...दिल्लीतील VVIP भाग -पंतप्रधानाच्या घराबाहेर संपूर्ण दिवस ठिय्या आंदोलन केले...पोलिसांनी फरफटत नेलं...असा माणूस पाहून मला पण वाटतं...नेता असावा तर असा...आज ते मेट्रोमधून आले शपथ घेण्यासाठी...मुंबईतील एक आमदार,खासदार, नेता मुंबई लोकलमध्ये प्रवास करेल.??..रस्त्यावर बसून आंदोलन करेल??...आदर्श प्रकरणावरून मुख्यंत्र्यांना विरोध करण्यासाठी वर्षा आणि मंत्रालयाबाहेर आंदोलन करतील??...सामान्य मुंबईकरांना समजून घेण्याचा प्रयत्न करतील??....या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला नाही मिळतात...खूप त्रास होतो....ही मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरणारे, मोठ्या बंगल्यांमध्ये राहणारे, कडक इस्त्रीचे कपडे घालून फिरणारे यांना काय माहितं एका छोट्या संधीसाठी सामान्य माणूस किती तडफडतो...निवडून आल्यावर यांची भाषा बदलते..अहंकार येतो...कसला अहंकार हा...हे त्यांनाचं ठाऊक..!! 

           रामलीलामध्ये आज 'जन गण मन'गाताना...खूप भरून आलं.. जंतर मंतर-रामलीलाच्या खूप आठवणी दाटून आल्या...एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटल...अण्णांना किमान लोकपाल मिळालं आणि अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले..पण त्याचवेळी इतकीचं आशा वाटतं होती...आपल्या देशांचं,महाराष्ट्रातलं चित्रं पण बदलेलं असंच कधी तरी...आपल्यातला माणूस पण कधी तरी बनेल पंतप्रधान -मुख्यमंत्री...अरविंद केजरीवाल हा आशावाद देण्यासाठी Thank You आणि खूप खूप शुभेच्छा... 

Sunday 1 December 2013

दिल्लीतील मनसे-आम आदमी पक्ष ?

             
              दिल्ली विधानसभा निवडणुकी इतकी चुरशीची निवडणुक सध्या कुठलीचं नाही...कॉग्रेसविरोधात नाराजी, भाजपाचं चाचपडण आणि आम आदमी पार्टीचं या दोघांनाही आव्हान..
   खूप वर्षापासून दिल्लीत राहणारे ज्येष्ठ पत्रकारांशी बोलल्यावर ते सांगतात, दिल्लीत आधी राजकारण पंजाबी मतदारांवर अवलंबून होत...पण गेल्या वीस वर्षात उत्तर प्रदेश आणि बिहारची लोकसंख्या वाढली..याचा फायदा कॉग्रेसने घेतला..शीला दीक्षित या माहेरच्या पंजाबी, लग्नानंतर यूपीचे नेते उमाकांत दीक्षित यांची सून..त्यामुळे त्यांनी पंधरा वर्ष सत्ता गाजवली..

           पण आता या निवडणुकीत मात्र शीला दीक्षित यांना सगळचं कठीण दिसतयं...तसं बघितलं तर शीला दीक्षित यांना वैयक्तिक पातळीवर मुख्यमंत्री म्हणून आजही लोकप्रियता आहे..पण यूपीए सरकारच्या विरोधातील नाराजीचा सगळ्यात जास्त फटका त्यांना बसलाय..राहुल गांधीच्या सभा,याचं उदाहरण..

            कॉग्रेसविरोधात जर इतकं मत असलं तरी त्याचा फायदा भाजपाला होताना दिसतं नाहीये..कारण आम आदमी पक्ष!!!
भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदावरून जे काही मतभेद होते, ते सगळ्यांनाच दिसलं..पण आम आदमी पक्षाने प्रचारापासून,ते जाहीरनामा घोषित करण्यापर्यंत कधीचं आघाडी घेतली होती.. असं असलं तरी अण्णा हजारे यांच्या पत्रानंतर आणि 'आप'च्या उमेदवारांच्या स्टींग ऑपरेशन नंतर मात्र मतदार ही साशंक झाले आहेत..याचा फटका आम आदमी पक्षाला नक्कीचं बसलाय.

दिल्लीत आम आदमी पक्षाविषयी जितकं आकर्षण आहे,तितकचं आकर्षण लोकांना नरेंद्र मोदींचही आहे..मत कोणाला देणार याचं उत्तर केजरीवाल किंवा नरेंद्र मोदी हेचं येत...हे खूपचं विचित्र आहे..

             सरकारी नोकरी सोडून राजकारणात आलेले अरविंद केजरीवाल आणि चहा विकून,मेहनत करून इथंवर पोहचलेले नरेंद्र मोदी यांच्याविषयी तरूणांमध्ये आकर्षण तर आहेच..पण इतरांमध्येही आहे..यावेळी पहिल्यांदा मतदान करणार्या तरूणांची संख्या जास्त आहे( त्यातील किती जण खरचं मतदान करणार, हा वेगळा प्रश्न आहे)

           आम आदमी पक्षाविषयी विरोधक मुद्दा मांडतात, आमच्यापेक्षा ते वेगळ कसे...आम्ही ज्यांना तिकीट नाकारली..त्यांनीचं त्यांनी तिकीट दिली..त्यात राजकीय विश्लेषक म्हणतं आहेत,ज्या मतदारसंघात आम आदमी पक्षाचा उमेदवार खास नाही,तिथं ती मत भाजपाला जातील.

            आम आदमी पक्षाचीं मदार पण अरविंद केजरीवाल या एकाच नेत्यावर आहे...जशी मनसेची राज ठाकरेंवर
एकचं नेता प्रसिध्द,ज्याची जनमानसात ओळख आहे,ज्याला लोक ऐकतात,प्रतिसाद देतात...दुसऱ्या फळीत नेतृत्त्व कुठे आहे ..आम आदमी पक्षातील कार्यकर्ते मात्र सगळेचं तरूण असल्यानं उत्साह दांडगा आहे..सोशल मीडियावर भाजपा इतकेचं ते ही आक्रमक आहेत..अरविंद केजरीवाल यांचे रेकोर्डेड संदेश मोबाईल वर येतात...

             दिल्लीच्या एफएम वाहिन्यांवर तर सध्या राजकीय नेत्यांचेच संदेश येतात..एका ब्रेकमध्ये अरविंद केजरीवाल,नरेंद्र मोदी,राजनाथ सिंह,नितीन गडकरी,शीला दीक्षित सगळेचं येऊन मत मागून जातात...असं असताना मतदार गोंधळणार नाही तर काय?

         तर एकूणच या निवडणुकीत आम आदमी पक्षाला किती मत पडतात किंवा त्या मतांमधून किती जागा मिळतात हेचं खूप महत्त्वाचं आहे...पण आम आदमी पक्ष हा दिल्लीतील मनसे होण्याची शक्यता जास्त आहे..

 आज ड्राईव्हरने मला जाता जाता प्रश्न विचारला, "मॅडम confuse हूं".. म्हटलं "क्या हुवा?"..तो म्हणाला, "किसको वोट दूं , अभी तक डिसाईड नहीं किया"...विचारलं.. " Option क्या है?"  तर  म्हणाला, "आप (आम आदमी पक्ष) और बीजेपी!"

                    अशीचं अवस्था अनेकांची आहे...आता मतं कोणाला जातयं याचं उत्तरं आठ डिसेंबरला मिळेल...