Saturday 28 December 2013

'आम आदमी' की खास सरकार!!

          
            दिल्लीत आल्यावर सगळ्यात मोठी story कोणती cover केली असेल तरी ती अण्णांच जनलोकपालचं आंदोलन...या आंदोलनाच्या वेळी पत्रकार परिषदेत साध्या वेशात एक माणूस होता..त्याविषयी जास्त माहिती नव्हती म्हणून बाईट घेण्याचा प्रश्न नव्हता..अण्णाच्या पत्रकार परिषदेत अण्णा, किरण बेदी, मग प्रशांत भूषण दिल्लीचे वकील,ओळखीचा चेहरा..पण हा एक माणूस होता,त्याच्याकडे आम्ही आंदोलन कसं असेल, काय करणार याची माहिती घ्यायचो...जंतर मंतर दररोज अण्णाचे वन टू वन शक्य नव्हते..त्या साधा माणसाला जाऊन सांगितल..दररोज सकाळी आणि संध्याकाळी एक वेळ ठरवा आणि प्रेस कॉन्फरन्स घ्या...त्याने चक्क ऐकलं...तो साधा माणूस अरविंद केजरीवाल...अरविंद केजरीवालांबरोबर पक्ष स्थापनेच्या दिवशी ते काही महिन्याआधी दिल्लीच्या रस्त्यावर बसून आंदोलन करताना बातम्या केल्या...पण तेव्हा जाणवलं नाही, ते पुढे जाऊन दिल्लीचे मुख्यमंत्री होतील...
                                                                                                                                                                              आज पुन्हा त्याचं रामलीला मैदानावर अरविंद केजरीवाल आणि त्यांची टीम होती आणि पुन्हा तेचं आम्ही...ते व्यासपीठावर आले तेव्हा एकचं विचार मनात आला...अरे हा तर आपल्यातला माणूस होता...आज हा मुख्यमंत्री झाला...जंतर मंतरवरून राजकारणात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला...आणि आज त्यांनी राजकारण बदलू शकतं, हे उदाहरणासह दाखवून दिलं.. आम आदमी पक्षाविषयी आताचं जास्त आस्था नाही वाटतं मला...कारण मनसे असेल, अण्णांच आंदोलन असेल...दर वेळी वाटायचं काही होईल,ही लोकं आपल्याला निराश करणार नाहीत...पण वेळेनुसार अंदाज चुकले,अनुभव वेगळे आले आहेत...त्यामुळे आता पटकन विश्वास ते ही राजकीय पक्षावर...जरा कठीण आहे. 

           पण असं असलं तरी अरविंद केजरीवालांना एका गोष्टीसाठी मी मानते...त्या माणसानं राजकारणात उतरायचं ठरवल...एका वर्षात दिल्लीत पक्ष छोट्यातल्या छोट्या माणसापर्यंत नेला...राजकारणात एखाद्याचं मूल्यांकन हे निवडणुकातील निकालांनुसार ठरतं...आणि राजकीय पक्ष जात,धर्म आणि काय काय बघून मतदारसंघात उमेदवार उभे करतात.. अरविंद केजरीवाल स्वत हरियाणाचे ..निवडणुक लढवायची, सत्ताधार्यांना आव्हानं द्यायचं तर त्यांनी शीला दिक्षीत यांच्या विरोधात निवडणुक लढवली...आणि पंधरा वर्षात जी भाजपा शीला दीक्षितांना हरवू शकली नाही...त्यांना अरविंद केजरीवाल यांनी आपल्या आयुष्यातील पहिल्या निवडणुकीत हरवून दाखवल...हिंमत्त म्हणतात ती ही...अरे एकदा भिडायचं ठरवलं ना तर सरळ भिडायचं...आज अनेक नेते आपला आपला सुरक्षित मतदारसंघ निवडतात...त्यात आव्हान काय? 

        महाराष्ट्रात असे कोणते विरोधी पक्षातले नेते तुम्हांला दिसतात जे अजित पवारांना आव्हान देऊ शकतात?? ( इथे मुख्यमंत्री म्हणतं नाही कारण ते स्वत विधान परिषदेवर निवडून आले आहेत..) शिवसेना आणि मनसे अध्यक्ष अजित पवारांचं आव्हानं स्वीकारतील?...समोरासमोर निवडणुक लढवतील...?? अरविंद केजरीवाल झोपडपट्टीत गेले,छोट्यातल्या छोट्या माणसाशी बोलले...रस्तावर बसून आंदोलन केली...दिल्लीतील VVIP भाग -पंतप्रधानाच्या घराबाहेर संपूर्ण दिवस ठिय्या आंदोलन केले...पोलिसांनी फरफटत नेलं...असा माणूस पाहून मला पण वाटतं...नेता असावा तर असा...आज ते मेट्रोमधून आले शपथ घेण्यासाठी...मुंबईतील एक आमदार,खासदार, नेता मुंबई लोकलमध्ये प्रवास करेल.??..रस्त्यावर बसून आंदोलन करेल??...आदर्श प्रकरणावरून मुख्यंत्र्यांना विरोध करण्यासाठी वर्षा आणि मंत्रालयाबाहेर आंदोलन करतील??...सामान्य मुंबईकरांना समजून घेण्याचा प्रयत्न करतील??....या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला नाही मिळतात...खूप त्रास होतो....ही मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरणारे, मोठ्या बंगल्यांमध्ये राहणारे, कडक इस्त्रीचे कपडे घालून फिरणारे यांना काय माहितं एका छोट्या संधीसाठी सामान्य माणूस किती तडफडतो...निवडून आल्यावर यांची भाषा बदलते..अहंकार येतो...कसला अहंकार हा...हे त्यांनाचं ठाऊक..!! 

           रामलीलामध्ये आज 'जन गण मन'गाताना...खूप भरून आलं.. जंतर मंतर-रामलीलाच्या खूप आठवणी दाटून आल्या...एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटल...अण्णांना किमान लोकपाल मिळालं आणि अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले..पण त्याचवेळी इतकीचं आशा वाटतं होती...आपल्या देशांचं,महाराष्ट्रातलं चित्रं पण बदलेलं असंच कधी तरी...आपल्यातला माणूस पण कधी तरी बनेल पंतप्रधान -मुख्यमंत्री...अरविंद केजरीवाल हा आशावाद देण्यासाठी Thank You आणि खूप खूप शुभेच्छा... 

No comments:

Post a Comment