Saturday 31 August 2013

बलात्कार ,भोंदू बाबा आणि ती!

                   ती एका सामान्य घरात जन्मलेली..आई-वडिल सुशिक्षित,आपल्या मुलांनी त्यांच्या आवडीचं शिक्षणं घ्यावंयासाठी प्रोत्साहन देणारे..अगदी मुलांनी धार्मिक आस्था किती पाळाव्या,कशा पाळाव्याइतकं स्वातंत्र्य तिला त्या घरात मिळालं..अध्यात्माची आवड होती..देव या संकल्पनेविषयी,फोर्सविषयी जाणून घेण्याची इच्छा तिला होती. कुटूंबातील ओळखीच्यांकडून एका अध्यात्मिकगुरूंची ओळख झाली.कठोर साधना करणारे अशी त्यांची ओळख..त्या गुरूंना भेटल्यावर तिला स्वत:ला जाणवलं ,की हे इतरं भोंदू बाबांसारखे नाहीत..त्यांची अध्यात्मिक बैठकआहे..त्यामुळे जमेल तेव्हा ती त्यांना भेटायची..मानसिक शांती,देव, आत्मा या अशा अनेक विषयांविषयी समजून घेण्यासाठी..
                हे अध्यात्मिक गुरू साधना करून एक पत्र लिहायचे आणि त्या पत्रात पुढील एका वर्षात येणाऱ्या त्यांच्या आसपास असणाऱ्या साधकांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांविषयी लिहायचें...आणि अनेक साधक नेहमी सांगायचे, बाबाजी लिहीतात ते खरचं घडलयं...तिचा त्यावर विश्वास बसला नाही,आध्यात्मिक गुरूंच्या या गोष्टींकडे तिने जरा दुर्लक्षचं केलं.
        पण एकदा तिला अचानक त्या गुरूच्या एका साधकाचा फोन आलसला..बाबाजींच्या पत्रात तुझं नाव आलयं..तुला भेटायला बोलवलयं.तिला जरा आश्चर्यचं वाटल.मी त्या गुरूंच्या खास जवळची साधक नाही,नेहमी त्यांना भेटणं-बोलणं व्हायचं नाही...परिचयं झाल्यापासून अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या भेटी झाल्या असतील..घरच्यांना सांगितल्यावर ते म्हणाले जाऊन भेटून ये,भेटण्यात काही प्रॉब्लेम नाही..तीही ऑफिसमधून हाफ डे घेऊन तत्काळ निघाली. बसने  चार-पाच तास प्रवास करतं ती साधकाने सांगितलेल्या पत्त्यावर पोहचली.पूर्ण प्रवासात ती हाच विचार करत होती..काय लिहिलं असेल पत्रात, बाबाजींनी इतक्या पटकनं का बोलवून  घेतलं.माझा काय संबंध..
              बाबाजींकडे पोहचल्यावर त्यांनी तिला बसवून समजवलं, पत्रात कसं तिचं नाव आलयं, पण काय लिहिलयंहे सांगण्याआधी तिची खात्री पटावी म्हणून त्यांनी तिला सांगितलं, आधी तू तुझी काहीमाहिती एका कागदावर लिही, जसं की तुझ्या जवळच्या मित्रमंडळीची नाव,आवडतं फळ, आवडतंपुस्तकं...आणि तू लिहिलेली माहिती मी तशीचं सांगितली तर हे गुप्त पत्रवाचशील..तिने आपल्या Friendsची नावं लिहिलं..आवडती फळं,पुस्तक लिहीली..आणि आश्चर्याचाधक्का की त्या बाबाजींनी तिने लिहिलेली माहिती अचूक सांगितली..तिचा विश्वास बसायला  लागला..
              यापुढे त्या बाबाजींनी जे पत्र वाचलं ते ऐकून ती कोसळलीचं ..बाबांजीच्या भविष्यानुसार पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत तिच्यावर बलात्कार होणार असल्याचं त्या पत्रात लिहिलं होतं...ती ज्या मित्रांवर विश्वास ठेवतं ,त्यातील कोणी फसवेल,तिच्यावर बलात्कार होईल आणि ती लोक तिच्या आई-वडिलांकडून पैसेही मागितली..आणि यात आई-वडिल कोणाला शॉक लागून मृत्यू ही होईल...यापुढे जाऊन पत्रात लिहिलं होतं..पूजा-शांती करून घटना टाळता येऊ शकते..पण सदर व्यक्ती या गोष्टी मानतं नसल्यामुळे,हट्टी असल्यामुळे तिच्यासोबत हे कुकर्म होण्याची शक्यता आहे...त्याक्षणी तिला हे सगळं तंतोतंत आपल्याविषयी असल्याची पूर्ण खात्री पटली...ती धडं रडूही शकतं नव्हती..काही समजतं ही नव्हतं..बाबाजींनी सांगितलं, आपण आजचं पूजा करूया,ती गोंधळात..पुढे ते म्हणाले, पूजेसाठी पाच लाख रूपये लागतील...हे ऐकल्यावर तिच्या डोक्यात तिडीक गेली..डोळ्यासमोर आयुष्यभर मेहनत करणारे आई-वडिल आठवले,ज्यांनी खूप कष्ट घेत,कर्ज काढून आपल्याला शिकवलं, चांगल घरं,सर्व सुखसोयी दिल्या..हे पैसे कुठून आणायचे,का आणायचे, आई-वडिलांनी का द्यायचे...त्याक्षणी इतकचं समजतं होतं, हे जे काही होतयं ते चुकीचं आहे..                           पाच लाखाची कोणती पूजा बलात्कार थांबवणार..कोणत्याही मुलीला तिच्यावर  बलात्कार होईल ,यासारखी वाईट भीती घालण्यासारखी नाही...पण असं कोणी सांगत असतानाही तिने बाबाजीला स्पष्ट सांगितलं..की ती ही पूजाकरणार नाही. तिने पटकनं आई-वडिलांना फोन केला...त्यांना सगळं सांगितलं...पाच लाखांची पूजा घालायची नाही,हे ही सांगितलं..त्यांनी तिला धीर दिला...तिला शांत व्हायला सांगितलं...तिच्या आई-वडिलांनीही तिला तिचा निर्णय योग्य असल्याचा विश्वास दिला आणि परतं यायला सांगितल..
              संपूर्ण रात्र तळमळत,रडतं तिने काढली...ती तिथून कोणालाही काहीही न सांगता पळून गेली..पहाटेच्या बसने घरी आली...आणि ती स्वत विचार करत होती..तिचे सगळे मित्र स्वभावाने चांगले आहेत... कोणीचं रात्रीउशीरापर्यंत बाहेर फिरत नाही,सगळे एकमेकांची काळजी घेतात..
           या घटनेनंतर नाही म्हटलं तरी तिचे आई वडिल पुढचं एक वर्ष तिला घरी यायला उशीर झाला की फोन करायचे,काळजी करायचे...ती पण या भीतीत कुठे जाणं टाळू लागली..आयुष्यात कधी नव्हे, तिनं गुढीपाडव्याची वाट पाहिली,प्रत्येक दिवसं मोजला...तिच्याबाबतं काहीचं असं झालं नाही...पण हे सगळं झाल्यावरं तिच्या लक्षात आलं आपणचं आपल्या प्रश्नांची उत्तर शोधली पाहिजे,  आपणचं गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजे, कोणावरही विश्वास ठेवण्यात अर्थ नाही...यापुढे आयुष्यात कुणाच्याही भीतीनं जगायचं नाही...
          आसपास आज इतकी बलात्काराची प्रकरण होतं असताना तिला असं वाटतं, तिच्यावर बलात्कार होईल या भीतीतं कधी काळी तिने –तिच्या कुटुंबियांनीएक वर्ष काढलं...मग ज्या मुलीवर खरंच बलात्कार झाला,तिला काय वाटतं असेल..तिच्या आई-वडिलांची काय अवस्था असेल...
        आस्थेच्या नावावर तिच्यासारखे अनेक लोकं ,काही कारणाने अध्यात्मिक गुरूंच्या संपर्कात येतात..पण यागुरूंचं वागणं, पैसे कमवण्याची वृत्ती आणि त्यासाठी समोरच्याला टोकाची घालणारी भीती-ही घाणेरडी वृत्ती  यामुळे तिने एका क्षणात विश्वास करण्याची ताकद गमावली....आज जिथे माणूस स्वतच्या नातेवाईकांवर विश्वास ठेवत नाही,तिथे तो या असल्या भोंदू बाबांवर सरसकट विश्वास ठेवतो..का??..अनेक भोंदू बाबांची दुकानं जोरात चालली आहेत, त्यांच्याविरोधात प्रकरण येऊनही सुशिक्षित लोकं,राजकारणी यांना पाठिंबा देतात, पोलिस संरक्षण देतात हे पाहून ती उद्विग्न होते...डॉ.नरेंद्र दाभोलकर म्हणून तिला हवे होते...पण कदाचित आता सगळचं  सावरण्यापलिकडे गेलयं...ती स्वता:पुरतं झगडतं आहे.. पण समाज कधीचं आंधळा झालायं.