Monday 3 June 2013

तुरतूक -भारताच्या वेशीवरच शेवटच गावं

                                   1971 च्या भारत पाकिस्तानच्या  युद्धात Ladakh scoutsचे  Major Chewang Rinchen यांनी पाकिस्तानच्या बल्तीस्थानातील चार गाव ताब्यात  घेतली ….  Chaulankha, Turtuk, Tasky and Thang. मग ही  गाव भारताची झाली यातील तुरतूक  हे गाव भारताच्या वेशीवरच शेवटच गाव आहे! कारण  या पुढे Tasky and Thang जी दोन गाव आहेत त्या गावांमध्ये मध्ये भारतीय सैन्याचा तळ असल्यामुळे तिथे कुणालाही जाण्यची परवानगी  नाही … पण  तुरतूक  गावामध्ये २ ० १ ०  पासून जाण्याची परवानगी भारत सरकारने दिली. त्यामुळे या गावात आता पर्यटक येऊ लागले आहेत . त्यासाठी स्थानिक पोलिसांकडे फक्त  आपली ओळखपत्र द्यावी लागतात. या गावात  अगदी कामासाठी बाहेरून कामगार ही  गेले तरी त्यांची नोंद पोलिसांकडे होते .
                          तुरतुक  हा शब्द आला 'डुकडूक'  या शब्दातून … डुकडूक  म्हणजे चलो बैठते है … येथील स्थानिक अशी कहाणी सांगतात , तुर्किश लोक या गावात सर्वात आधी आले. . त्यांनी  ठरवलं या गावात आराम करूया… आणि  या गावाचं  नाव डुकडूक  शब्दावरून तुरतूक झालं। हे गाव  पर्यंत पाकिस्ताना मध्ये होत…  गावातील जुनी लोक  आजही सांगतात ,आम्ही झोपलेलो पाकिस्ताना मध्ये , पण  सकाळी उठलो तर भारतात होतो. आजही या गावातील अनेकांचे नातेवाईक पाकिस्तान मध्ये आहेत .
                  भारतात  हे गाव आल्यावर  जी नवीन पिढी आहे , ते म्हणतात  इथे आल्यावर या गावाची प्रगती झाली. कारण भारतात आल्यावर आम्हाला शिक्षण , रस्ते, वीज या सोयीसुविधा मिळाल्याच  स्थानिकांच  म्हणणं  आहे . रशीद उल्लाह खान या एकवीस वर्षीय  तरुणाने सांगितलं , आमचे आजी आजोबा सांगतात …की  पाकिस्तान मध्ये ते असताना गाव दुर्लक्षित होतं . त्या देशातही हे गाव शेवटचं होतं… रस्ते, वीज, शिक्षणा सारख्या सुविधा नव्हत्या . पण भारतात आम्हाला रस्ते शिक्षण मिळाल. तुरतूक गावात आता पाच शाळा आहेत .  1999च्या कारगिल युद्धाची झळ  या गावालाही बसली . त्यानंतर या गावातील तरुण सैन्यामध्ये ही भरती झाले .
             या गावातली लोकसंख्या मोजून २ ५ ० ० आहे …  शेती आणि भारतीय सैन्याला आवश्यक असलेलं मनुष्यबळ पुरवणे हे या गावाच उपजीविकेच साधन आहे. पर्यटनाला या गावात २ ० १ ० पासून   सुरुवात  जरी झाली असली तरी   गावात आजही १० टक्के लोक पर्यटनाच्या व्यवसाय करत आहे . त्यातही वर्षातून फक्त तीन महिने पर्यटनाचा सीझन असतो . त्यामुळे लोक शेती वर जास्त अवलंबून असतात . तुरतूक गावात अंड्यापासून ते सिमेंट पर्यंत गोष्टी लेह मधून येतात … लेह या गावापासून २ २ ० किमी अंतरावर आहे . या गावातून लेह ला जाण्यासाठी खारदुंग ला पास  वरून जाव लागतं … जो रस्ता १ ८ हजार ft वर आहे
इथल्या लोकांच्या चेहऱ्याची ठेवण ही  आपल्यापेक्षा वेगळी आहे . हे याचं मिश्रण आहे त्यांचे डोळे छोटे पण नाक मात्र मोठं.   इथे लोक  बल्ती भाषा बोलतात.  ही  भाषा फक्त बोलता  येते.   लिहिता  किंवा वाचता येत नाही कारण या भाषेची विशेष अशी  लिपी नाही. 
              तुरतूक गावात आजही  संध्याकाळी 7.30 ते रात्री 11 फक्त इतके तास वीज येते. आणि तरीही इथली लोक तक्रार करत नाहीत … कारण त्यांना आता सवय झालीये.  वर्षातले तीन महिने बर्फामुळे इथे शाळांना सुट्टी असते. जनजीवन  तेव्हा ठप्प असतं . या तीन महिन्यात लागणारं अन्नधान्य - सामान सगळं लोक natural fridge मध्ये जपून ठेवतात . लवकरच  इथे  वीज प्रकल्प उभा राहणार आहे .
             या गावातील ८ ० टक्के  लोक आजही या गावाबाहेर गेलेली नाहीत . गावाबाहेरच जग त्यांना माहित नाही . इथे सिनेमा हॉल  नसल्यामुळे प्रत्येक आठवड्याला येणारे नवीन movies माहित नाही .  TV वर लागणारे चित्रपट लोक पाहतात .  या गावातील अनेक मुलं  पदवीच्या शिक्षणासाठी गावाबाहेर जातात … तसाच  रशीद उल्लाह  खान-हा  एकवीस वर्षीय तरुण गेली ६ वर्ष शिक्षणासाठी बंगळूरू  या शहरात  आहे … त्याला कन्नड भाषा समजते। तो कन्नड भाषेत थोड थोड बोलतोही … कॉलेजला सुट्टी लागली कि तो गावात परत येतो आणि आपल्या कुटुंबियांना शेतात , कामात मदत करतो ऱशिद्च्य मामाच्या तंबू मध्ये आम्ही थांबलो होतो .  तेव्हा गावात फिरवून आणणं , गावाची माहिती देणं , हे सगळं  त्यानेच केलं . तो सांगतो पर्यटकांमुळे गावातल्या लोकांना बाहेरच्या जगाची झलक मिळते. इथल्या  लोकांना सगळेच पर्यटक परदेशी वाटतात.  रशीद सांगतो , आधी मी गावात English, Hindi मध्ये बोललो की  इतर लोक हसायचे , पण आता मात्र तरुण ही  भाषा  शिकतात,त्यांना जाणवलं ही  भाषा शिकणं  गरजेच आहे .
          या गावात आम्हांला  मोबाईल  नेटवर्क नव्हतं … इंटरनेट  तर अजून लांबची गोष्ट … इथे लोकांना Facebook, Twitter काहीच माहित नाही … जगापासून लांब , आपल्याचं कोशात जगणारी ही  तुरतूक गावातील लोक वेगळीच … आपल्याला पाहून लाजतात … कॅमेरा पाहून लपतात … काहीजण कुतूहलाने जवळ  येऊन  बोलतात … पण आपल्याच देशाचे हे बांधव आपल्यापासून इतके वेगळे आणि अपरिचित !