Saturday 28 December 2013

राजकारण- आम आदमीच्या (समजुतीच्या) पलिकडेचं!!

            
                आम आदमीपक्षाविषयी लिहिलं तो एक राजकारणाचा Emotional भाग होता..आपल्या देशात मतदार असाचं विचारकरतात...जेव्हा सरकार विरोधात प्रचंड राग आणि चीड असते...आणि अशावेळी जर कोणी छोटीशी पण दाखवली..तर लोकं त्यांना मतदान करतात...पण राजकारणाचा एक Practical भाग आहे, ज्यानुसार राजकारण चालतं...

                    दिल्लीत निवडणुकाझाल्या..भाजपाला 31 (अकाली दल 1) , आपला 28, कॉग्रेसला 8, अपक्ष 2 जागा मिळाल्या.

   #भाजपा

-भाजपाने दिल्लीत सत्तास्थापन केली नाही कारण त्यांच्याकडे बहुमत तर नव्हतं पण त्यांना राष्ट्रपती राजवटलागू होऊन, विधानसभा आणि लोकसभा पुन्हा व्हाव्यात असं वाटतं होतं
-कारण दिल्लीतविधानसभा निवडणुकीच्यावेळी लोकं म्हणतं होती..."विधानसभा के लिए अरविंद और लोकसभा के लिए मोदी!"
-कोणाला मानायचं नसलं तरी नरेंद्र मोदी हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे..जो तरूणाईला, मध्यमवर्गीयांना,कॉग्रेसविरोधात प्रचंड राग असलेल्या जनतेत आहे....जर दिल्लीत विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र झाल्या तर सगळ्यात जास्त फायदा भाजपाला होईल.
-त्याहून महत्त्वाचं म्हणजे आम आदमी पक्ष दिल्लीतचं अडकून पडेल...आम आदमी पक्षाकडे कार्यकर्ते नाहीआहेत..या पक्षाचा एकचं चेहरा आहे, अरविंद केजरीवाल...जर केजरीवाल हे दिल्लीतल्या दोन निवडणुकांमध्ये गुंतले तर आम आदमी पक्ष दिल्लीबाहेर जास्त ताकद लावू शकणार नाही, मर्यादा येतील त्यांच्यावर!

#आम आदमी पक्षाविषयी

-आम आदमी पक्षविरोधी पक्षात बसायला तयार होता..त्यांना आपल्याला सत्ता स्थापन करावी लागेलं असं वाटलचं नाही...पण कॉग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे त्यांची अडचण झाली.
-सत्ता स्थापन केलीनाही तर लोकंच दोष देणारं...संधी मिळून पण जबाबदारी टाळली...आणि कॉग्रेसचा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन केली तर दोष..म्हणून जनसभा करून त्यांनी हे दाखवलं दिल्लीची जनता सांगतेय म्हणून आम्ही सत्ता स्थापन करतोय.
-पण हे करताना आम आदमी पक्षाने हे स्पष्ट केलं की आम्ही कोणाचाही पाठिंबा घेतला नाही..तीन जानेवारीला विश्वासमत सिध्द करताना ज्यांना पाठिंबा द्यायचाय त्यांनी द्यावा..
-आम आदमी पक्ष तीनजानेवारी पर्यंत सात दिवस सरकार स्थापन करण्याच्या हिशोबानं आलयं...जर टिकलं तर त्यांना दोन महिने मिळतात.(फेब्रुवारी पर्यंत लोकसभा निवडणुक जाहीर होईल, Code of Conduct लागल्यावर कोणतेही निर्णय होत नाही)  या दरम्यानं लोकांसाठी काही  मोठे निर्णय घेऊन आपण करून दाखवलं हे सांगत  लोकसभा निवडणुकीला सामोरं जाता येईलं.

-जर तीन जानेवारीला सरकार पडलं तरी लोकांचा पुन्हा emotional पाठिंबा मिळेल, "अरे इन्होंने कोशिश तो की...दुसरीपार्टीयों ने सरकार चलने नहीं दी.." .त्यामुळे आपचं सरकार चालण ही आप पेक्षा दुसऱ्यापक्षांवर जबाबदारी जास्त आहे...कारण हे सरकार पाडल्याचं पातकं कुणालाही नकोय..
-आपने दिल्लीत सरकार स्थापन केल्यामुळे दिल्लीबाहेर हा पक्ष वाढायला, त्यांना मदत होतेय...राजकारणात असाही बदल घडू शकतो  दाखवल्यामुळे आपकडे अनेक तरूण, सुशिक्षित वळतं आहेत..आपची सध्या वेगवेगळ्या राज्यात कार्यकर्ता नोंदणी सुरू आहे..त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय..लोकसभा निवडणुकीसाठी  किमान आपकडे दिल्लीबाहेर कार्यकर्ते तरी वाढत आहेत ...जे आता कमी आहेत..


    #आता सगळ्यातमहत्त्वाचं म्हणजे कॉग्रेस

-कॉग्रेस हासत्ताधाऱ्यांचा पक्ष आहे...हे उगीचं कोणी म्हणतं नाही...कॉग्रेसला नुसत्या निवडणुकाचं जिंकता येत नाही...तर विरोधकांना सत्ता स्थापण्यापासून अडवता ही येतं..चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये सडकून मार खाल्यावर कॉग्रेसने किमान दिल्लीत भाजपाला सत्ता स्थापन करू दिली नाही.. म्हणून त्यांनी आपला पाठिंबा देत पुढे केलं..
-नितीन गडकरी काल जे म्हणाले त्यात तथ्य आहे...कॉग्रेसला या गोष्टीची पुरेपूरं कल्पना आहे की २०१४ च्यालोकसभा निवडणुकीत त्यांचं पानिपत होतं आहे....पण ही सत्ता काहीही झालं तरी नरेंद्र मोदींच्या हातात त्यांना जाऊ द्यायची नाही....त्यासाठी जे जमेल ते करायचंय!! ( नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये बारा वर्ष  जितका त्रास कॉग्रेसने दिलाय, त्याची परतफेड करण्याची एकही संधी कॉग्रेसला त्यांना द्यायची नाही! )
-कॉग्रेस वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना ताकद देतंय...जसं बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांना ते जवळ करणार आहेत..(लालू तुरूंगातून बाहेर येताचं नरेंद्रमोंदीच्या विरोधात बोलले)..उत्तर प्रदेशात मायावतींना ते जवळ करतील...ज्या ज्या राज्यांमध्ये जमेल तिथे ते मोदींच्या पायात पाय घालण्याचा प्रयत्न करतील....
-२००९ लोकसभाच्यावेळी मुंबईत लोकांनी Emotional  होऊन मनसेला भरभरून मत दिली...याचा फायदा झाला कॉग्रेसला...त्यांचे खासदार निवडून आले...असाच फायदा कॉग्रेसला आपचा शहरी भागात  करून घ्यायचा आहे.
- आपला दिल्लीत तरूणांनी, पहिल्यांदा मतदान करणारे, मध्यमवर्गीय, सुशिक्षित,सोशल नेटवर्किंगचा प्रभावअसलेल्या मतदारांनी मत दिली...ही नरेंद्र मोदींची VOTE BANK आहे...आप आता ज्या ज्याशहरांमध्ये-राज्यांमध्ये जाईल तिथं ते कॉग्रेस विरोधातील पण नरेंद्र मोंदींनाअपेक्षित असलेली मतं घेतील..आणि कॉग्रेसचा फायदा होईल, असं कॉग्रेसला वाटतय....त्यामुळे आप जितकी मजबूत तितका कॉग्रेसचा फायदा

           सध्या विविध राजकीयपक्षात, ज्येष्ठ पत्रकारांमध्ये ज्या चर्चा चालू आहेत, त्यातून आलेले मुद्दे आणि मला जे दिसतयं, कळतयं ते इथे मांडण्याचा प्रयत्न आहे..हे चित्र दुसर्यांच्या नजरेतून वेगळही असेल...पण राजकारण हा अतिशय Interesting Game आहे...मतदार हा Emotional असल्यामुळे  त्याला कोणीभाबडी आशा दाखवली की तो त्याला मत देतो...पण त्याला हे समजतं नाही की त्यानेज्याला मत दिलं त्याचा खरा फायदा होतोयं कुणाला...आणि राजकीय पक्ष अशीच रणनीतीआखतं असतात...

1 comment:

  1. क्या बात है रश्मी. मस्त मस्त मस्त.

    पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

    आपला,
    (वाचक) धोंडोपंत

    ReplyDelete