Thursday 29 March 2012

मृत्युचा क्षण मनापासून जगायचं!!

                              मृत्यू, किंवा त्याच्या विषयी बोलायचं म्हटलं की लोकांना आवडत नाही...एखादी व्यक्ती मृत्यूविषयी बोलायला लागली तर ती व्यक्ती दुखी आहे,आत्महत्या करेल असे विचार लोकांच्या मनात येतात...पण मृत्यू विषयी बोलन म्हणजे आयुष्याचा कंटाळा आला किंवा आयुष्य नकोय असा होत नाही!! मृत्यू हे एक सत्य आहे,अपरिचित आणि गूढ...जसं जन्माला येणं आपल्या हातात नाही तसं मरण ही आपल्या हातात नाही...एकदा जन्माला आल्यावर जगावं लागतच! भले ही कधी कधी जगण्याची इच्छा मेलेली असली तरी...कोणी मन मारुन जगत...कोणी हसतं हसतं...जन्मल्यापासून आपण कस जगायचं हे आपले आई-वडील मग शिक्षक ,समाज शिकवतं असतो...थोड मोठं झाल्यावर माणूस स्वतःच्या पूर्वानुभवातून कस जगायचं हे शिकतो..आयुष्य हे इतक मोठं असत की मग कधी कधी आपण ते जगत नसतो...आयुष्य आपलं आपलं जगायला लागतं..जेव्हा एखादा अनुभव नवीन किंवा पहिला असतो तेव्हा त्यातील आनंद,दुख किंवा भावना तीव्र असतात..पण जसं जसं जगायला शिकतो तसं अनुभवांची मज्जा घेण्याची वृत्ती आपण गमावतो...हे म्हणजे अर्थशास्त्रातल्या  Law of marginal diminishing utilityसारखा आहे..म्हणजे जेव्हा तुम्ही खूप तहानलेले असता तेव्हा पाण्याचा पहिला घोट खूप तृप्तता देतो..दुसरा घोट हा पहिल्या घोटापेक्षा कमी तृप्तता देतो..आणि एकदा तहान भागली की मग पाण्याचं कौतुक ही राहत नाही...आयुष्याचा ही तसंच आहे...लहान असताना जो आनंद मिळायचा तो मोठं झाल्यावर गमावतो...कारण आपण अनेक क्षण जगलो असतो..ते क्षण विसरून पुढे जायला शिकतो...आयुष्याचं कौतुक राहत नाही...पण मृत्युचं तसं नाही..मृत्यूचा क्षण हा प्रत्येकाच्या आयुष्यात एकदाचं येणारा आहे ...आणि तो कधी,कोणत्या स्वरुपात येईल हे कुणालाच माहित नाही..म्हणजे तो अपरिचित आहे...मृत्यूला कसं समोर जायचा हे कोणीच शिकवलं नाही..कुणालाच माहित नाही..मृत्यू कसा असतो,तो आल्यावर काय होतो..आणि तो आल्यावर कस वागायचं...त्या क्षणाला प्रत्येकाला आपल्या कुवतीनुसार,वृतीनुसार सामोर जायचंय...आणि म्हणूनच मला मृत्युचं आता जास्त आकर्षण वाटतं!गेले २६ वर्ष मी तर जगतच आहे...ती आता एक नियमित गोष्ट झाली..आता कदाचित खूप उत्कंठेन,किंवा खूप आर्ततेन आयुष्य जगू शकणार नाही...कारण आयुष्य जगताना अनेक वेळा अनेक अनुभव येऊन गेले आहेत...पण मृत्यू हा एकमेव आहे...म्हणूनच तो क्षण मला मनापासून जगायचं आहे!! मला नव्या कोऱ्या मनाने त्याला समोर जायचा आहे...काय माहित पुढे कधी जन्म मिळेल, परत कधी मृत्यू ची गाठभेट होईल का?? याचा अर्थ हा नक्कीच नाही मी आयुष्याचा अनादर करतेय किंवा मला त्याची किंमत नाही...मला माझ्या आयुष्याची किंमत आहे आणि मी कधी नव्हे ते मुक्त मनाने,भूतकाळाची ओझी उतरवून जगायला शिकलेय...पण त्याचा वेळी मृत्यूची पण ओढ लागलीये!!

No comments:

Post a Comment