Thursday 29 March 2012

लाडकी दुःख !


                                 लोकांना दुःख  बिलकुल आवडत नाही..दुःख ज्या गोष्टींमुळे होतं ती गोष्ट अप्रिय,NEGATIVEअसे शिक्के मारून सगळे जण दुःख  नाकारतात..पण इथेच तर चुकत ..प्रिय,अप्रिय आठवणी,POSITIVE,NEGATIVEविचार असं काही नसत..एखादी गोष्ट किंवा घटना घडल्यावर तुम्ही त्याला कसं REACTकरता यावर तुम्हीच ठरवता ती गोष्ट प्रिय की अप्रिय...दुःखाचं घेऊया...दुःख का होतं?..आपल्याला काही इच्छा असते..ती पूर्ण होतं नाही म्हणून दुःख होतं..पण जेव्हा गोष्ट मनासारखी होता नाही..त्रास होतो तेव्हा आपण चौकटीबाहेर जाऊन  विचार करायला लागतो..आपण उत्तर शोधायला लागतो,ती नाही मिळाली की तडफडतो..आपण दुःखातून  बाहेर पडण्यासाठी आकांडतांडव करतो...दुःख दूर करायला सगळी शक्ती पणाला लावतो..दुःखात माणूस RISK घेतो..प्रत्येक दुःखाची एक KICK बसते..प्रत्येक दुःख माणसाला शिकवतं..काहीना काही देऊन जातं..माणूस म्हणून आपण  सहनशील तर होतो..पण दुसर्यालाही समजून घ्यायला शिकतो...
                         आपल्याला एखादा विचार किंवा भावना आली की आपण त्यांना पकडून पटकन LABELING करतो..हा विचार चांगला..हा विचार वाईट..हा विचार POSOTIVE..हा विचार NEGATIVE ..का?करणं आपण ठरवलंय..जे वाईट,आहे त्यामुळे दुःख मिळणार..पण कधी कोणतीही भावना,विचार ही तशीच्या तशी जगलीयेत?एकदा अनुभव घेऊन पहा..त्या विचारात,भावनेत मस्त डुबकी मारा ..हळूहळू आत,खोलात जायचं ..कधी त्रास होईल ..भीती वाटेल ..मध्येच दम लागतो..पण पुन्हा मनाचा हिय्या करून  त्या भावनेचं अंतरंगात जायचं..एकदम आत गेल्यावर भीती वाटायला लागतं..की आता आपण बाहेर नाही जाऊ शकणार की काय..घुसमटायला होतं..मग सुरु होते पुन्हा परत फिरण्याची धडपड..आणि मग आपण हळूहळू प्रयत्न करून वर येतो,खूप थकतो.. किनार्याला धापा टाकत पोहचतो..किनार्यावर थकून बसले  असताना  जाणवतं , अरे बापरे..किती मोठा डोह आहे..आपण बरीच मजल मारून आलो..ती धाप पण खूप आनंद देऊन जाते .... आणि महत्वाचं म्हणजे पुढच्यावेळी डोहात किती उतरायचं हे पण नकळत कळत!
आपल्या  आयुष्यातलं कोणताही दुःख असू  दे..प्रेमभंग,हवी ती संधी न मिळण,आपल्या लोकांना गमावणं....कोणतही दुःख..प्रत्येक दुःखाने घडवलंय..किंबहुना दुःखाने आणि वेदनेनच आपल्याला घडवलंय..जगण्याचा एक नवीन पैलू दाखवला असेल..महत्वाचं म्हणजे आपल्याला आपण माणूस आहोत,याची जाणीव करून दिली असेल ....आपला स्वाभिमान,अभिमान,दुराभिमान ,अहंकार,द्वेष यापलीकडे जाऊन गोष्टी पाहायला शिकवलं असेल..आपण  कुणावर प्रेम केल..मनापासून..भलेही ते प्रेम आयुष्यात टिकलं नाही..हे दुःख..पण म्हणून  प्रेम करणं वाईट नाही ठरत..कुणावर प्रेम करताना मनापासून आनंद होतो..कुणावर माया करताना,जीव लावताना..आपण  आतमध्ये झुरतो,कधी प्रेमपत्र लिहितो ,देवाकडे मनापासून काही उत्तर मागतो..हे किती सुंदर आहे..मग प्रेमाच्या या आठवणी अप्रिय होतात का?त्या व्यक्तीबरोबर घालवलेला क्षण आणि क्षण मौल्यवान होता..असतो...ते क्षण टिकले नाही..ती व्यक्ती आयुष्यात टिकली नाही म्हणून आधीचे क्षण,प्रेम अप्रिय होत नाही..आपल्याला हवी ती संधी मिळत नाही म्हणून त्रास होतो..पण त्यासाठी केलेली धडपड..मेहनत वाया जाते का?नाही..एक दरवाजा बंद झाला म्हणून आपण थांबत नाही..अजून चिडतो ..अजून पर्याय शोधतो ..जोपर्यंत आपल्याला  हवे ते उत्तर मिळत नाही तो पर्यंत वणवण करतो...हे वाईट आहे का ?नाही..यामध्ये आपण स्वतःला स्वतःच्या मर्यांदा तोडायला लावतो.. 
आपलं माणूस दुरावणं,त्याचा मृत्यू  हे सगळ्यात जास्त त्रासदायक..पण आयुष्यात जेव्हा असं माणूस दुरावतं तेव्हा एकं गोष्ट जाणवते..या आयुष्यात काहीच शाश्वत नाही....या जगात आपलं असं काही नाही..प्रत्येक जण भेटतं,कोणी चांगले तर कोणी वाईट अनुभव देऊन जातं..कोणी प्रेम करतं..कोणी माया करतं तर कोणी द्वेष.. आणि मग निरोप घेऊन आपल्या पुढच्या प्रवासाला जातो..कोणी जास्तवेळ आपल्याबरोबर असतं..कोणी कमी वेळ..बस...त्यामुळे या सर्व आपल्या लोकांकडून मिळालेली दुःख ही अप्रिय किंवा वाईट कशी ठरतात..त्यांच्या आठवणी अप्रिय कसी होणार?त्यांचा विचार करणं म्हणजे विचार करणं कसं काय असू शकत?ही तर हवीहवीशी दुःख आहेत..मी तर अशा दुःखांना खूप जपलंय..जेव्हा जेव्हा मला वाटतं..संपल सगळ ..मी थकलेय, अजून धडपडू शकत नाही.. तेव्हा अडगळीतून ही माझी लाडकी  दुःख काढते..त्यांना पुन्हा नव्याने उपभोगते..कारण मला माहितीये..ते मला पुन्हा अस्वस्थ करतात..एक छान  KICK देतात... पुन्हा लढायला..RISKघ्यायला,जगायला भाग पाडतात...

No comments:

Post a Comment