Thursday 29 March 2012

"मी" चा शोध!

एक काळ होता जेव्हा मी अशा काही कल्पना बनवून घेतल्या होत्या ..म्हणजे आयुष्यात काय ACHIEVE करायचं,काय टप्पे असायला पाहिजे म्हणजे मी यशस्वी झाले असा आलेख बनवून ठेवला होता...माझ्या आयुष्याचं 'लक्ष्य' जणू मला मिळाल असं मला वाटलं तेव्हा ...आणि त्याच्या उन्मादात मी पळत सुटले...पहिल्यांदा मज्जा आली...मला हवे तसे काही यशाचे टप्पे लागले..काही गोष्टी मनाविरुद्ध झाल्या..पण तरी लक्ष्याच्या मार्गावरून धावत होते म्हणून आनंद...हळूहळू वेग कमी झाला...मग दम लागायला लागला...मग प्रश्न पडायला लागले...अन प्रश्न पडला...आपण का पळतोय??कशासाठी धावतोय??आपण जे लक्ष्य म्हणतोय ते आयुष्याचं खरंच लक्ष्य असू शकते का??आणि या सगळ्यांची उत्तर नकारार्थी आली...आणि मी विचार न करता चक्क ब्रेक मारला...दणकन अपघात झाला...एक वर्ष गेलं या अपघातामधून बाहेर यायला...पण त्या प्रश्नांनी केलेली अस्वस्थता वाढतचं होती...मधल्या काळात अजून समस्या, प्रश्न वाढत गेले...त्यातून एक गोष्ट शिकले आयुष्य कधीच कधीच आखून जगता येत नाही..त्यामुळे आपल्या हवे तसंच घडेल...हा हट्ट सोडला...पण प्रश्न तर होतेच ..हे असंच का...तसंच का??आणि मग प्रश्न इथवर आले...मीच का??आणि मग ठरवलं मीच का हा प्रश्न विचारण्याआधी मी कोण हे तरी सापडायला हवं...मी कोण, मी अस्वस्थ का??मी आवडीचं खाल्लं,छान छान कपडे घातले,आवडीचं काम केल...थोड्या वेळासाठी किक बसते..बरं वाटतं.....पण पुन्हा पोकळी,पुन्हा अस्वस्ताथा...ही पोकळी काय आहे आणि का??याचा उत्तर शोधता शोधता कळलं, एवढे दिवस जे चोचले पुरवले ते या शरीराचे....ध्यास घेतला तो काही भौतिक सुखाचा...शरीराची भूक ,शरीराला आनंद मिळावा,प्रतिष्ठा मिळावी म्हणून झटले...पण ते आतपर्यंत झिरपतचं नव्हत आणि आत्ता खात्री पटली...चूक झाली...आणि हळूहळू कळू लागलं की मी म्हणजे फक्त माझं शरीर नाही.!!आरशात जे दिसत..आई-वडिलांनी ज्याला रश्मी हे नाव दिलंय ते शरीर म्हणजे "मी" नाही...माझे विचार,भावना ,क्रिया-प्रतिक्रिया म्हणजे मी ! आरशात दिसत ते एक बाह्य रूप...खरी मी कोण ...जी आतमध्ये खोलवर रुतालीये...जी शरीराचे सर्व कर्म करते..पण त्यापलीकडे जाऊन पण जगते...जर शरीर म्हणजे मी असते...तर सर्वच लोक सारखी वागली असती,सगळ्यांच्या क्रिया-प्रतिक्रिया सारख्या असल्या असत्या!...पण सगळ्यांच्या क्रिया-प्रतिक्रिया वेगळ्या आहेत...विचार करण्याची,मांडण्याची पद्धत सगळ वेगळ आहे..आहे...जे वेगळं आहे.. तेचं खरं आहे...प्रत्येकाचा 'मी'..!...शरीर हे फक्त एक माध्यम आहे.या माध्यामाद्वारे आपण वेगवेगळे अनुभव घेऊ शकतो..या माध्यमाला त्याच्या PROPERTIES आहेत...जसं शरीराला लिंग,जात,वर्ण, वय,सुंदर, असुंदर,पद पैसा, प्रतिष्ठा...अशा अनेक PROPERTIES आहेत...आणि या मिळवण्यासाठी आपण धडपडतो...पण आतल्या "मी" कडे दुर्लक्षच होतं ..आणि मग एक पोकळी येते...पोटाची भूक भागवली..पण" मी" ला गांभीर्याने घेतलंच नाही... "मी" हा महत्वाचा अशासाठी कारण तो आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवतो....जर "मी" समाधानी असेल तर पोकळी असणारं नाही ....आता एकूणच या सापडलेल्या "मी" ला नक्की काय हवंय...ते अजून गवसत नाहीये!!कदाचित तो शोधही लागेल...वेळ लागेल त्याला..पण सापडेल कधीतरी उत्तरं!

1 comment:

  1. ट्विटर व्हाया आपल्या ब्लॉगवर पोहचलो..

    बरेचसे ब्लॉग वाचले.

    अनुभवांचे सुंदर वर्णन केले आहे आपण.

    लिहिणे बंद करू नका..मोकळ्या वेळेत लिहीत जा..

    👌

    ReplyDelete