Thursday 29 March 2012

एक प्रवास!!


           एकटेपणा कधीच कुणाला नकोसा असतो..तो कोणी मागून घेत नाही..तो लादला जातो..असं झाल की मग हादरायला होतं..अरे आपण तर होतो नेहमी इतरांसाठी..मग आपल्याला गरज होती तेव्हा कोणीच कसं नाही??किंवा कोणी असलं तरी त्यांना आपल्याला काय होतंय,आपल्याला काय हवंय..अगदी मायेचा हलकासा स्पर्श ही पुरेसा असतो..प्रेमाचे दोन शब्द आणि आणि एक स्पर्श ही मागून मिळवण्याची वेळ आली, तेव्हा कळलं अरे ही लोक आपली नाहीच मुळी!!आणि मग वेदना वाढत जातात..एखाद्या फिल्म मधलं एखाद पात्र,एखादा प्रसंग ,नाटक,गाणं..एखादा पुस्तकं वाचल्यावर मिळणारा अनुभव भन्नाट,  वेगळाचं असतो..आपण चिंब भिजलेलो असतो...आणि ते कुणाला सांगायला गेलो तर तो कोरडा प्रतिसाद... गप्प करून जातो ..मग हळूहळू आपणच एकटे भिजायला शिकतो..आपणच आपले कोरड व्हयला ही शिकतो..
                       कधी कधी कोणी मित्र,मैत्रिणींच्या रुपात भेटतातही  ही..पण त्याचं आपल्याला समजून घेणं  हे त्यांच्या परिघात,त्यांच्या  टाईम आणि स्पेसप्रमाणे..म्हणजे पुन्हा आपलं व्यक्तं होण  हे इतरांच्या गरजांनुसार,वेळेनुसार  असं वाटायला लागत.. चालायचंच..यातून ही शिकत जातो..आणि मग एक वेळ येते जेव्हा जाणवत,अरे आता आपण आपल्याच बरोबर मजेत आहोत..आपण एकटेचं एन्जोय करू शकतोय..जे अनुभव सांगायचे आहेत ते लिहून ठेवायचे..मग कधी कधी वाटत आपल्यातच काही तरी गडबड आहे..आपण उगीचच जास्त विचार करतो का,आपल्याला जे फील होत,जे जाणवत तेच मुळी चुकीच आहे का??स्वतः वरचाच विश्वास उडू लागतो..ओर्कुट अथवा फेसबुकवर अनोळखी मित्रानंमध्ये असं समजून घेणारं..आपल्या इतक इंटेन्स आणि वेड कोणी तरी भेटत आणि खात्री पटते अरे आपण इतके ही विचित्र नाही आहोत..अशा अनोळखी मित्रानं बरोबर मग मात्र गप्पा रंगतात,फुलतात..
आणि एकटेपणा पळून जातो....अन आता आयुष्यातला एकटेपणाची मज्जा येते..नशा चढते..कधी ही उठा ,हवी ती गाणी ऐका,वेड्यासारखी पुस्तकं वाचा..वाटल्यास लिहा..भटका..या सगळ्यात इतका भन्नाट आनंद मिळतो..तो कदाचित कोणी बरोबर असूनही मिळाला नसता..
एकटेपणाच्या प्रवासाची सुरुवात  पडतं,अडखळत ,ठेचकाळत झाली तरी नंतरचा प्रवास खूप शिकवणारा आणि जगायला लावणारा नक्कीच आहे..

No comments:

Post a Comment