Thursday 29 March 2012

मी -एक पत्रकार !


'पत्रकार दिन' म्हणून शुभेछा आल्या तेव्हा अचानक विचार आला अरे,आपण पत्रकार व्हायचं असं का आणि कधी ठरवलं? नेमकं आठवत नाही..पण लहान असताना महाराष्ट्र टाइम्समध्ये कुमार केतकरांचे संपादकीये वाचायचे..खूप आवडायचं..मग METROवर आजतक यायचं..सुधीन्द्रप्रताप सिंघ दररोज रात्री बातम्या वाचायचे..त्यांचं ते वाक्य,"तो ये थी खबरे आजतक,इंतजार किजीये कल तक!" खूप आवडायचं. बारावीनंतर फायनल ठरवलं पत्रकारितेत जायचं..BMMला ADMISSIONघेतली..अभ्यास करत असताना आधी लोकसत्तामध्ये INTERNSHIPकेली..केतकर आवडायचे म्हणून! (दररोज हळूच लांबून त्यांच्या केबिनमध्ये पाहायचे..पण त्यांच्याशी कधीच बोलायला मिळाल नाही!एकदाचं ते मी जिथे बसायचे तिथे कोणाशी काम होतं,म्हणून आलेले,तेव्हा मी अशी वेड्यासारखा त्यांच्याकडे पाहत बसलेली.त्यांच्याकडे पाहून हसले..त्यांनी पण SMILE दिलं.आणि मी सगळ्या मित्र मैत्रीणीना फोन करून करून सांगितलं..केतकर सरांनी आज SMILE दिलं!) दररोज ऑफिसला PTIच्या बातम्यांचं भाषांतर करायचे..आशिष जाधव आणि सुजय शास्त्री हे तेव्हा माझे सर..सुरुवात तर- एका म्हशीला गाडीने टक्कर दिली अशा बातम्यांचं भाषांतर करून केली..मग हळूहळू जरा महत्वाच्या बातम्या मला भाषांतरासाठी दिल्या..केतकर सरांना पाहायला मिळतं ,इतकंच तेव्हा समाधान..पण मला ते भाषांतर वगैरे कधीच आवडलं नाही..मग सकाळमध्ये एक आठवडा INTERNSHIP..आणि मग मटामध्ये  INTERNSHIPकेली..मटामध्ये  INTERNSHIP मागायला गेले तेव्हा एकाHR MANAGER ने मुलाखत घेतली.त्यांनी विचारलं पत्रकारिता का करायचीये,"मी म्हंटल मला समाजात बदल करायचा आहे,प्रसारमाध्यम लोकांच्या मतांवर,राजकारण्यांवर काम करण्याचा दबाव आणू शकतात..म्हणून" त्यांनी  मला स्पष्ट सांगितलं,"असला विचार घेऊन पत्रकारीते मध्ये येणार असशील तर ते चुकीचं आहे..समाज वगैरे काही बदलता येत नाही!" पत्रकारितेची विद्यार्थिनी..असे मोठे मोठे विचार,स्वप्न घेऊन फिरणारी मी..ऐकून धक्काच बसला.. हे होऊनही मटामध्ये  INTERNSHIPकेली.पण त्यानंतर मला खरंच वाटायला लागलं मी पत्रकार बनू शकणार नाही.आत्मविश्वास गेला..आपण चुकीचा विचार केला की काय असं वाटायला लागलं..आता careerला दुसरा पर्याय काय ते पण शोधायला सुरवात केली..या सगळ्यात ETV MARATHIची परीक्षा दिली..आणि त्यात SELECT झाले..वयाच्या विसाव्या वर्षी पहिली नोकरी..ती ही ETV मराठी मध्ये!उडत उडत हैद्राबादला TRAININGसाठी गेले..तेव्हा पहिल्यांदा कॅमेरा,हातात BOOM..खूप छान वाटलं..मेघराज पाटील बातमी कशी लिहायची हे शिकवायचे ..राजेंद्र हुंजे,रुपेश,माणिक मुंडे,स्वप्नील,अपर्णा,केतकी सगळे मोठे,SENIOR COPY-EDITOR
..त्यांची बातमी पाहायचो..पण हे शिकत असतानाही जाणवत होतं,मला हे काम नाही आवडत.मला बाहेर FIELD वर गेलं पाहिजे..आणि लवकरच मुंबईला TRANSFER मिळाली..पहिल्यांदा हातात BOOM घेऊन जाताना इतका अभिमान..पहिला PTC करताना चेहऱ्यावर इतकं हसू..मला आठवत माझी पहिली BY-LINEवाली स्टोरी होती..आणि बाईट्स होते पण VISUALSची कॅसेट मिळाली नाही..बुलेटीनसाठी २ तास होते पण कॅसेट मिळेना..वाईट रडले..शेवटी कुठल्यातरी FOLDERमध्ये VISUALS SAVE करून ठेवलेले मिळाले..बातमी लागली..घरच्यांनी पाहिली..सगळे खुश..
पहिले नवीन नवीन दिवस खूप उत्साहात..१२-१४ तास काम करायचे..पत्रकार झाल्यामुळे अनेक थरातल्या,क्षेत्रातल्या मोठ्या मोठ्या लोकांना भेटायला मिळालं..आवडते कलाकार,लेखक,राजकारणी..त्यांना मस्त प्रश्न विचारायचे..INTERVIEWकरायचे.खूप छान वाटायचं..आनंद व्हायचा..पण हळूहळू या सर्व मोठ्या लोकांचा कॅमेरा बंद झाल्यावरच खरा चेहरा कळायला लागला,त्यांचं खरं वागण दिसलं..मी ज्यांना आदर्श मानायचे,ते कसे आदर्श नाहीत हे दिसलं ..खूप त्रास व्हायचा सुरवातीला..वाईट अनुभव आले की रडायचे माझे BOSS साठे सरांना सांगायचे..ते समजावयाचे-बातमीत जास्त कधीच गुंतू नये..तू पत्रकार म्हणून जा..तुला कोणी आवडत किंवा एखाद्या बातमीचं तुझं PERCEPTION घेऊन गेलीस तर त्रास होणार!आणि दिसतं तसं कधीच नसतं...बातमी मागची बातमी काय असू शकते याचाही विचार कर! मग हळूहळू बातमीकडे पाहण्याचा  तटस्थपणा आला..आणि कुणालाही फक्त बातमी म्हणूनच पाहायला लागले!
                  अनेकदा बातमी करताना कुणाला मदत करू म्हणून स्वताहून पुढाकार  घेतला आणि काम झाल्यावर लोक जशी वागणूक देतात ते पाहून जास्त राग यायचा..मुंबई ट्रेन ब्लास्ट झाल्यावर एका कुटुंबियांना मदत मिळावी म्हणून आर.आर.पाटील यांच्याकडे घेऊन गेलेलो..आबांनी बातमी पाहिलेली..त्यांच्याकडून मदत मिळाली..त्या कुटुंबाने धन्यवाद दिले..आपण काहीतरी करू शकलो याचं समाधान होतं.. पण उगीच त्याची बातमी केली नाही. कशाला CREDIT घ्यायचं?..पण थोड्या दिवसांनी त्या कुटुंबीयांनी आम्हांला अबू आझमीमुळे मदत मिळाली असा एका वर्तमानपत्राला सांगितलं.आम्हाला सरकारने मदत केली नाही असं सांगितलं..ती बातमी वाचून राग आला,वाटलं आपण चुकीच्या लोकांना मदत केली नाही ना?त्याक्षणी ठरवलं कधीच अशी कुणाला मदत करायची नाही..कुणावर विश्वास ठेवायचा नाही.असंच मुंबई स्फोटातील अजून एक म्हातारे काका होते..त्यांची मुलगी मतीमंद होती,बायको अपंग,ते एकटेच कमावणारे.ते स्फोटात जखमी झालेले.सरकारकडून मदत मिळत नव्हती..अशी बातमी करून मदत मिळत नाही हे आता एक दोन वर्षाच्या अनुभवत कळलेलं..पण त्यांचं मन ठेवायचं,म्हणून बातमी केली..आणि त्यांना चक्क दोन महिन्याने पैसे मिळाले..ते फोन करून रडले..त्यांच्या ऑफिसमध्ये मला बोलावलेलं,धन्यवाद द्यायला..पण मी गेले नाही..म्हणजे त्यांना पैसे मिळाले,मदत मिळाली..याचं समाधान होतं..पण याचं आपल्याला CREDIT आहे,असं मला वाटलं नाही!
कोर्टाच्या बातम्या करताना BREAKING NEWSची नशा अनुभवली..इतकी मज्जा यायची..एक बातमी ब्रेक करायची मग सगळे फोन करून माहिती विचारायचे.दिवसभर तुमचीचं बातमी  CHANNELवर चालतेय..फक्त तुमचा PHONO,LIVE.याची खुमारी वेगळीच..आणि ते पाहून इतरांच्या प्रतिक्रिया..ओळखीचे,नातेवाईक..सगळ्यांचं कौतुक..हे असं सतत तीन वर्ष चालू होतं.एकदा कोर्टात एक बातमी होती एका महिलेला सातव्या महिन्यात  ABORTION करायचं होतं..पण कायद्याने परवानगी नव्हती..ती बातमी अशीच मिळाली..पहिल्यांदा त्या महिलेचे VISUALSमिळालेले..आपली बातमी याचं समाधान..पण न्यायालयाने ABORTION साठी परवानगी दिली नाही..दुसर्या दिवशी चर्चा तिचा गर्भपात झालाय..BREAKING बातमी..पण CONFIRM करायची होती..तिच्या नवर्याला घाबरत घाबरत फोन लावला..त्याने वाईट शिव्या दिल्या,बोलला,"तुमच्यामुळे आम्हांला त्रास झाला,जगणं हराम केलंत ..तुम्ही सारखा कॅमेरा घेऊन मागे येता..लाज वाटते का?" आणि आयुष्यात पहिल्यांदा खाडकन कोणीतरी थोबाडीत मारल्यासारखं झालं.
CRIME BEATकरताना दररोज बातम्या शोधायचे.एकदा सकाळपासून बातमी शोधात होते..आणि कळलं एक बलात्काराची केस आहे..बातमी मिळाली..आनंद झाला..CRIMEच्या बुलेटीन PRODUCERला सांगितलं," तुला आज HEADLINEची बातमी देते..मस्त बलात्काराची बातमी मिळाली!" हे बोलल्यावर एका क्षणात जाणवलं..माणूस म्हणून मी अतिशय खालच्या पातळीवर गेलेय..माझ्या कामाच्या भरात मी जास्तीत जास्त कसं,किती वाईट काही मिळतंय का याचं शोध घेत होते.इतरांचं वाईट झालं तर मी खुश होतेय,हे चुकीचय !इतरांच्या वाईटावर बातम्या करून मी मिरवणार? आणि तेव्हा ठरवलं..बीट यापुढे करायची नाही.. आणि हे असं सतत विचार न करता चालू होतं..मुंबई ट्रेन ब्लास्ट,इतर अशा अनेक घटना,वाईट अपघात..यात त्या DEAD BODIES,रक्त पाहून कधीच रडू आल नाही..पण लोकांचा खोटारडेपणा,एकमेकांना वापरणं,खोट खोट वागणं,एकमेकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवण,ते राजकारण..याचं तिटकारा येऊ लागला ..हळूहळू आपण का धावतोय,आपल्याला काय मिळवायचं,माणूस  म्हणून कुठे पोहोचलोय याचा विचार करून करून त्रास जास्त व्हायला लागला..आणि म्हणून शिस्तीत पत्रकारिता करायची नाही असा मुर्खासारखा निर्णय घेऊन नोकरीचा राजीनामा दिला..पण पुढे काय ते माहित नव्हतं...  RECESSIONमुळे मग पुढे अनेक महिने कुठेच नोकरी मिळत नव्हती..अगदी शेवटी CALL CENTER मध्ये पण नोकरीसाठी गेले..तर माझा RESUMEपाहून ते म्हणाले तुम्हांला नोकरी देऊ शकत नाही. हातात BOOM नसल्यावर लोक तुम्हांला कसे वागवतात..हे ही त्या काळात   कळलं...तुमच्या नावामागे एक BANNER असला की लोक तुमचे फोन उचलतात..मदत करतात..जर हे नसेल तर इतरांच्या लेखी तुम्ही शून्य आहात.. तुमचे मित्र ..मित्र राहत नाहीत..हा ही अनुभव घेतला..पत्रकारितेच्या आत आणि बाहेर राहून अशी अनेक सत्य कळली..पण त्यावेळी हे ही कळलं मी पत्रकारीतेशिवाय, शिवाय राहू शकत नाही..मला सारखं असं फिरायला, माहिती शोधायला,लोकांना भेटायला आवडत..ती  BREAKING NEWSची नशा मला हवीये..मी एखादी बातमी झाल्यावर अगदी घरी असल्यावरही,सुट्टी असली तरी शांत बसूच शकत नाही..भूक लागत नाही,झोप येत नाही..रक्त उसळत राहत...आणि तेव्हा पहिल्यांदा जाणवलं पत्रकारीतेशिवाय दुसरं मी काहीचं इतकं चांगल, PASSIONATLYकरू शकत नाही..आणि मी परत आले..पुन्हा नव्याने सुरवात केली..आता पहिल्या इतका त्रास होतं नाही..कशाचाही परिणाम आता पहिल्यासारखा होतं नाही माझ्यावर .माझ्या घरच्यांना वाटतं मी पटकन चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, प्रत्येक गोष्टीत दहा शंका घेते..खूप CROSS QUESTION करते..खूप विचार करते... पण पत्रकार असल्यामुळे किंवा काही अनुभव खूप लवकर आल्यामुळे असेल कदाचित! इतकं नक्की एखादा माणूस पत्रकार झाल्यावर त्याच्यातला पत्रकार कधीच सहजासहजी मरत नाही!


No comments:

Post a Comment